Monday 16 January 2017

भारत-इंग्लंड सामना


image courtesy: Internet

काल भारत-इंग्लंड सामना बघायला खूपच मजा आली.
इंग्लंड विरुद्ध खेळत असल्यावर नेहमी आपण जिंकावं असंच वाटतं. 
आधीपासूनच एकतर वाटत होतं की पुण्याचं मैदान आपल्याला लकी नाही. त्यात इंग्लंडचे ३५० रन्स झाल्यावर तर सगळ्या आशाच सोडून दिल्या.
श्रे आणि मी घराबाहेर पडलो. आठवड्याची काही कामं उरकून दीड-एक तासात परत आलो.
येऊन पाहतो तर भारताचे ८४ धावांवर ४ आउट! आणि सगळे दिग्गज बादच्या यादीत दिसत होते. 

तरीही सगळा धीर एकवटून पुन्हा टीव्ही पुढे बसलो आणि मॅच पाहायला नंतर खरंच मजा आली.
केदार जाधव खूपच छान खेळला. केवढा दमला होता बिचारा.
नंतर परिस्थिती आवाक्यात आल्यावर स्टेडियम मधल्या प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
त्याच प्रेक्षकांमध्ये कॅमेरा केदारच्या आईवर गेला.
त्या एकच प्रेक्षक अशा होत्या की ज्यांच्या चेहऱ्यावर सामन्यापेक्षा माझा मुलगा बरा आहे ना याची काळजी स्पष्ट दिसत होती.

No comments:

Post a Comment