Wednesday 25 January 2017

कबुली

आधी ठरवलं होतं की समजा आपण ब्लॉग वगैरे तयार केला तर त्यावर रोज लिहियचं.
पण खरंच निवांत वेळ मिळाल्याशिवाय काही लिहिणं किती अवघड आहे हे चार दिवसातच समजलं.
इतके दिवस मी चांगले ब्लॉग्स नुसतेच वाचत होते आणि मनात यायचं हे लोक इतकं छान लिहू शकतात तर वारंवार का लिहीत नसावेत?
कोणाच्या ब्लॉगवर पूर्वी दर आठवड्याला अपडेट्स असायचे ते कोणाचे महिन्यावर तर कोणाचे वर्षावर गेलेले.
कोणाचा ब्लॉग २ वर्षांपूर्वी बंद पडलेला तर कोणाचा चार!
पण आता त्याचं उत्तर मिळालंय.
मला सहजच लिहायचं असूनही निवांत बसल्याशिवाय लिहावंसं वाटत नाही तर छान लिहिणाऱ्यांना तर अजून वातावरण निर्मिती लागत असेल ना!
डोक्यात दुसरेच काही विचार चालले असतील किंवा काही डेडलाईन असेल तर खरंच नाही जमत बुवा लिहायला.
आपली प्रांजळ कबुली!
आणि हो छान छान लिहिणाऱ्यांनी नक्की वेळात वेळ काढत जा!

No comments:

Post a Comment